Skip to main content

'कारखानीसांची वारी Ashes on a road trip




 मंगेश जोशींचा 'कारखानीसांची वारी' हा अतरंगी चित्रपट पाहिला. लिओ टॉलस्टॉयची एक अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे ऍना कॅरेनिना. त्याच्या सुरुवातीला एक कोट आहे. "All Happy families resemble one another, but each unhappy family is unhappy in its own way.’'. 'कारखानीसांची वारी Ashes on a road trip' हाही या कोटने सुरू होतो. एक सर्वसाधारण एकत्र कुटुंब. ज्यातील ज्येष्ठ व्यक्ती पुरुषोत्तम कारखानीस याचे निधन झालेले आहे. त्याच्या अंतिम इच्छेनुसार आता त्याचे 3 वयस्कर भाऊ , एक बहीण आणि मुलगा त्याच्या अस्थी गावाकडल्या घरात, शेतात आणि शेवटी पंढरपूरला चंद्रभागेत विसर्जित करण्यासाठी निघाले आहेत. अस्थीविसर्जन झाल्यानंतर एका लाखोट्यातील पत्राचे वाचन करावे असेही सांगून ठेवले आहे. आता कारखानीस परिवार एक टिपिकल मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब आहे. एकत्र असूनही प्रत्येकाची वेगळीच कहाणी आहे. वेगळीच सुखदुःखे, जगण्याची ओझी आहेत. पण एकमेकांना सांगायची चोरी असे हटवादी आणि अहंकारी प्रत्येकाचे स्वभाव. लखोट्यातील पत्रात इच्छापत्र असेल आणि माझ्या वाट्याला काही ना काही नक्कीच आले असेल जगणे तरून जायला असा प्रत्येकाचा समज. समज म्हणण्यापेक्षाही एक तीव्र इच्छा म्हणू. एक प्रकारचा लोभ या सर्वाना अस्थीविसर्जनाच्या निमित्ताने एकत्र आणतं आणि हे कुटुंब प्रवास करून कटु-गोड प्रसंगांना सामोरं जातं त्याची ही कहाणी आहे. हा वर्णन करून सांगायचा नाही प्रत्यक्ष पाहायचा सिनेमा आहे. तगडी स्टारकास्ट, त्यांचे एक अन एक एक्सप्रेशन टिपण्यासारखे, प्रत्येकाने एक नमुना उभा केला आहे. मृत्यूसारख्या गंभीर विषयाला हलकं फुलकं करता येतं हे 'व्हेंटिलेटर' सारख्या चित्रपटात पाहिले होते. तसाच हा अनुभव होता. आपल्या अवतीभवती घडत असलेलीच एखादी गोष्ट आहे अशी अनुभूती येते. एकत्र असूनही विभक्त प्रवास ही वास्तवाची समज या चित्रपटात आपल्याला मिळते. मोहन आगाशे, अमेय वाघ, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, अजित अभ्यंकर, मृण्मयी देशपांडे यांची या ही रोड ट्रिप. वंदना गुप्ते, शुभांगी गोखले याचे एक उपकथानकही आहे. या सगळ्यांनी एक कुटुंब एकत्र असूनही दुसऱ्याच्या मनातले भाव माहीत नाहीत, इतके आपण कसे आत्ममग्न होतो की कुटुंबाचा विचारच मनात येत नाहीत असे प्रश्न पडतात. लखोट्यातल्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलेलं असतं, प्रत्येकाची काय रिऍक्शन येते हे पाहायला नक्की पाहा 'कारखानीसांची वारी'. 


रमा

Comments

Popular posts from this blog

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...