Skip to main content

'सलाम'

आज मंगेश पाडगावकरांचा वाढदिवस. ऊफ्फ ते गेले नाही का.....जयंती..त्यांची जयंती!

ते 2-3 वेळा घरी येऊन गेले असतील,पण त्या माणसानं मला वेड लावलं. तसं वेड अनेकांनी लावलं, पण भेटता आलं फक्त यांनाच. आपली कविता सादर कशी करावी, 'कोई इनसे सिखें'.. त्या जाड काचेच्या चष्म्यातून डोळ्यातलं भावदर्पण प्रेक्षकां ना अर्पण कसं करावं..आणि आपल्या वाचकांच्या 'वाह वा' ला ही आपणच दाद कशी द्यावी, यांच्याकडूनच शिकावं.. ना विषयाचं, ना वयोमानाचं, कसलंच बंधन नसे या माणसाला. सुखं-दुःख, अनुभव, कल्पना साऱ्या साऱ्या पलीकडल्याही वास्तवाचं दर्शन घडवणारं हे निराळाचं रसायन. '

रस्ता चुकलेलं त्यांचं वेडं कोकरू जेव्हा आईच्या कुशीत शिरतं, आपल्या जीवात जीव येतो, आईची उब जाणवते .

कधी संध्याकाळी मनात काहूर माजतं, ते म्हणतात, 'डोळ्यात सांजवेळी, आणू नकोस पाणी'...
मीडियाचा मुजोरपणा आणि आतंकवाद, वाढती असहिष्णुता याने आपलं मन हतबल झालं की ते म्हणतात, 

' कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी..गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी'
हिडीस गाण्यावर थिरकणारी तरुणाई पाहून मला आठवते त्यांचे,

'चोली के पीछे कहू मी काय आहे,
ऐक रे भडव्या, तुझी मी माय आहे'

तुझी वाट तू स्वतःच शोधायची आहे असं सांगतात ते,
'सांगा कसं जगायचं, रडत रडत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा'...

कबीर असो किंवा शेक्सपिअर, भाषांतर हे शब्दाची मदत घेऊन आशयाचे करायचे असते हे तेच दाखवून देतात. भारी माणूस. एका शब्दात त्यांना विश करायचं तर मी म्हणीन 'सलाम'!


Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...