Skip to main content

सलील चौधरी : एक श्रद्धांजली


बंगाल प्रांत हा मुळातच मुग्ध करणारा प्रदेश आहे. कलाप्रेमींवर तर बंगालची कायमच जादू राहिली आहे. के एल सेहगल पासून अनिल बिस्वास, एस डी, आर डी, हेमंतकुमार,
किशोरकुमार, मन्ना डे ते लोकगीतं गाणारे कुणी अनामिक, इथलं संगीत अत्यंत मधुर, मोहक संगीत आहे. या सर्वांतच मला 'सलील चौधरी' या संगीतकाराने नेहमीच मोहवून टाकलं आहे. आज सलील चौधरी यांचा जन्मदिवस.


सुरुवात झाली 'मधुमतीने'. एकूण 12 गाण्यांचं अप्रतिम प्रदर्शन. मुकेशची तरल "दिल तडप तडप" आणि "सुहाना सफर और ये मौसम हसीं", एकीकडे लताची आर्त हाक 
"आजा रे परदेसी", खेळकर "घडी घडी मोरा दिल धडके" आणि "जुल्मी संग आँख लडी" तर दुसरीकडे मोहम्मद रफीची "टुटे हुए ख्वाबोंने" ते "जंगलमे मोर नाचा" अशी बहुरंगी गाणी. "दैय्या रे, दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ" गाण्याप्रमाणे  लहानपणापासूनच सलीलदांनी मला झपाटून टाकलं. आणि फिल्मी गीतांच्या जादुई दुनियेत मी प्रवेश केला.

मुकेशने सलीलदांच्या निर्देशनखाली ज्याप्रमाणे गायले आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. अगदी 'मधुमती' च्या काळापासून ते 'आनंद' ची क्लासिक्स "मैने तेरे लिए ही", "कहीं दूर जब दिन ढल जाए" ते अगदी शेवटी शेवटी 'रजनीगंधा' मधलं "कई बार यूं ही देखा है" असेल, मुकेशने आपल्या हृदयीचे श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. 

मन्ना डे असे एक गायक होते ज्यांची सर्वोत्तम गाणी सलीलदांकडील होती. "दैय्या रे दैय्या रे' (मधुमती), "मौसम बिता जाय" ( दो बिघा जमीन), 'काबुलीवला' मधील यादगार
गीत "ए मेरे प्यारे वतन"..ऐकताना डोळ्यात पाणी येतं, मन भरून येतं. आणि 'आनंद' मधील "जिंदगी कैसी ये पहेली" यातले नितांत सुंदर स्वरमाधुर्य मन्ना डेनाच सादर करता आलं.

सलीलदांनी लता मंगेशकरांकडूनही अशी काही भावगाणी गाऊन घेतली की तोड नाही. "जागो मोहन प्यारे" (जागते रहो), "ओ सजना, बरखा बहार आयी" (परख), "ना, जिया
लागे ना" (आनंद), "न जाने क्यू, होता है यूं जिंदगी के साथ" (छोटीसी बात) ही सारी गाणी ऐकली की लता मंगेशकरांचे वेगळेच गायिकी ढंग समोर येतात. फक्त सलीलदाच असे संगीतकार असतील ज्यांनी कोरस मध्ये लता मंगेशकरना घ्यायचा प्रयोग केला असेल. द्विजेन मुखर्जी च्या 'माया' मधील गीत "ए दिल, कहाँ तेरी मंजिल" गाण्यात त्यांनी हा ऑपेरा कोरस यशस्वीपणे केला.

सलील चौधरींच्या संगीतात लोकगीत आणि शास्त्रीय संगीतातून स्फुरलेले संगीत यांचा सुगम संगम आढळून येतो. तलत-लता यांचे "इतना ना तू मुझसे प्यार बढा", मोझार्टच्या सिंफनीचा प्रभाव दिसतो. तसा अतिशय बेमालूम उपयोग त्यांनी अनेक गीतात केला. 

किशोरकुमारचा हट्टी, आवेगी, अनिश्चित असा स्वभाव सलीलदांनी नेहमी प्रभावीपणे हाताळला. 'हाफ टिकेट' च्या "चील चील चिल्लाके" त्यांनी किशोरकुमारला त्याच्या मर्जीप्रमाणे गाऊ दिले. पण 'मेरे अपने' तील "कोई होता, जिसको अपना" हे किशोरदांच्या सर्वात गाजलेल्या गाण्यांपैकी एक, हे गाणे सलीलदांनी ज्याप्रकारे गाऊन घेतले, खुद्द किशोरदांनाही नवल वाटलं.

सलील चौधरी 20 वर्षांपूर्वी जगातून निघून गेले, पण त्यांचे संगीत चिरंतन आहे. 

- रमा (अनुवादित) 
मूळ- Vikram Appasaheb Jadhav,
Kolhapur 19/11/2018

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...