Skip to main content

Posts

Showing posts from 2021

शांतीत क्रांती - मैत्री, विनोद आणि आत्मभानाची गोष्ट

काल खूप दिवस ज्याची वाट पाहणं सुरू होतं त्या ' शांतीत क्रांती ' या वेब सिरीजचं binge watch केलं. सारंग साठ्ये, पॉला मॅक्ग्लिन  दिग्दर्शित या बहुचर्चित सिरीज मध्ये 3 मित्रांची कथा आहे. प्रसन्न ( ललित प्रभाकर ), श्रेयस ( अभय महाजन ) आणि दिनार (आलोक राजवाडे ) यांची ही आजच्या तरुणाईला रिलेट होईल अशी गोष्ट. तीन मित्र, अगदी लंगोटी यार. अगदी 'हम दोस्त थे, दोस्त है और हमेशा रहेंगे' कॅटेगरी. तिघे गोवा रोड ट्रिप प्लॅन करतात पण श्रेयस त्या दोघांना 'शांतीवन' या ठिकाणी आणतो. एका ध्यान आश्रमासारखी ही जागा. या मित्रांच्या वरवरच्या हसत्या-खेळत्या आयुष्यात आत वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, जे ते शेअर करत नाहीत.तिघेही वरून आनंदी दिसले तरी आतून पार गोंधळलेले, विस्कळीत मनस्थितीतले. आपल्याला बऱ्याचदा डिनायलमध्ये जगण्याची सवय असते,  बऱ्याचदा आपला स्वतःचा स्वतंत्र विचार, मत न मांडता, लोक काय म्हणतील याचाच विचार करून, 'मी कोण आहे, मला नेमकं काय हवंय?' हे प्रश्न आपण स्वतःलाही विचारत नाही. त्यामुळे काही केल्या वास्तवाचा आपण स्वीकार करत नाही. आपण जसे आहोत त्या आपल्यातल्या मूळ व्यक्ती

सुमित्रा भावे - न सोसणारी एक्जिट

 सुमित्रा भावे गेल्या. माझी आवडत्या दिग्दर्शक जोडगोळीची अपरिमित हानी झाली. या बाईंनी मला काय काय दिलं त्यांच्या चित्रपटातून. दहावी फ, दोघी, देवराई, अस्तु, वास्तुपुरुष, कासव.   नुसतं भरभरून देणं, देणं आणि देणं. मला त्यांची शैली अफाट आवडायची. एक प्रयोगशील आणि दर्जेदार कलावंत हरपला. नेमकं काय आणि कसं बोलावं कळत नाही. सुन्न व्हायला होतं आहे. वयाच्या 78व्या वर्षी ही व्यक्ती चुटपुट लावून जाते. अर्थात सगळ्यांच्या मरणाने असाच त्रास होतो, पण मला राग येतो आहे. असं कोणी जातं का?  निसर्गाने असं कसं करावं असं काहीसं त्यांच्या विचारांच्या विसंगत मनात येत आहे.  विविध सामाजिक प्रश्न, त्यांचा नात्यांवर होणारा परिणाम, बंधने, जीवाची होणारी घुसमट याने पिचणारी स्थिती त्यांनी अनेकदा पडद्यावर चितारली. उपायही सुचवले. प्रेक्षक थोड्या थोडक्या का प्रमाणात त्या प्रश्नाबाबत डोळस आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन बाहेर पडायचे. 10 राष्ट्रीय पुरस्कार मिळवणं येऱ्यागबाळयाचं काम नाही. सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या सुवर्णकमळासह इतर अनेक पुरस्कारप्राप्त 'कासव'. असुरक्षित वाटलं की कासव अंग आकसून आपल्य

द मॅरीड वूमन - रिक्त की मुक्त?

Alt बालाजी ची नवीन वेब सिरीज द मॅरीड वूमन पाहिली. मंजू कपूर यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित. आस्था एक ड्युटीफुल, कर्तव्यदक्ष बायको, सून, आई पण त्याच बरोबर एक कॉलेज टीचर. संथ आणि एकसुरी बनलेलं आहे तिचं आयुष्य. सतत गृहीत धरलं जाणं, सतत दुय्यम वागणूक. पण विना तक्रार नाती निभावत राहायचं. कारण समाजाने तसे नियम आखलेत. तिची कहाणी तीच आपल्याशी बोलत सांगते पूर्णवेळ.  ऐजाज खान(इमाद शाह), तिने लिहिलेले नाटकाचे दिग्दर्शन करणारा एक स्वतंत्र, पुरोगामी विचारांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा, त्याच्याकडे ओढली जात आहे आस्था पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू होतो आणि तिच्या आयुष्यात येते पिपलिका.(मोनिका डोग्रा) ऐजाज ची विधवा. एक आर्टिस्ट. आस्थाहून खूप निराळी. दोघी दोन ध्रुवांसारख्या, तरी एकमेकींच्या जवळ खूप जवळ येतात, प्रेमात पडतात. पिपलिकाच्या मते, "प्यार जेंडर नही, रुह देखके होता है".  काय आहे नक्की या दोघींचं नातं? केवळ तनाचं की मनाचंही? भावनांचा कोसळणारा प्रपात, जो चिंब करत आहे दोघींनाही. हे सगळं हवं हवसं आहे आस्थाला. पण ती विवाहित आहे, तिला एक सर्वसाधारण कुटुंब आहे, मुलं आहेत. ती त्यांना सोडून