Skip to main content

सुमित्रा भावे - न सोसणारी एक्जिट


 सुमित्रा भावे गेल्या. माझी आवडत्या दिग्दर्शक जोडगोळीची अपरिमित हानी झाली. या बाईंनी मला काय काय दिलं त्यांच्या चित्रपटातून. दहावी फ, दोघी, देवराई, अस्तु, वास्तुपुरुष, कासव. 

 नुसतं भरभरून देणं, देणं आणि देणं.


मला त्यांची शैली अफाट आवडायची. एक प्रयोगशील आणि दर्जेदार कलावंत हरपला. नेमकं काय आणि कसं बोलावं कळत नाही. सुन्न व्हायला होतं आहे. वयाच्या 78व्या वर्षी ही व्यक्ती चुटपुट लावून जाते. अर्थात सगळ्यांच्या मरणाने असाच त्रास होतो, पण मला राग येतो आहे. असं कोणी जातं का?  निसर्गाने असं कसं करावं असं काहीसं त्यांच्या विचारांच्या विसंगत मनात येत आहे. 


विविध सामाजिक प्रश्न, त्यांचा नात्यांवर होणारा परिणाम, बंधने, जीवाची होणारी घुसमट याने पिचणारी स्थिती त्यांनी अनेकदा पडद्यावर चितारली. उपायही सुचवले. प्रेक्षक थोड्या थोडक्या का प्रमाणात त्या प्रश्नाबाबत डोळस आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन बाहेर पडायचे. 10 राष्ट्रीय पुरस्कार मिळवणं येऱ्यागबाळयाचं काम नाही.


सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या सुवर्णकमळासह इतर अनेक पुरस्कारप्राप्त 'कासव'. असुरक्षित वाटलं की कासव अंग आकसून आपल्या कवचात जातं पण परत समुद्राचा, जगाचा सामना करण्यासाठी, आयुष्याला भिडण्यासाठी त्या कवचातुन बाहेर पडावंच लागतं प्रत्येकाला. त्यामुळे सुमित्रा बाईंच्या नसण्याचं वास्तव तर स्वीकारावं लागेलच. अस्तु!


रमा जाधव


Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ