Skip to main content

'व्हेंटिलेटर आणि मी'

'व्हेंटिलेटर'...ICU किंवा IICU च्या बाहेर  चिंताक्रांत, जीवाचं रान, डोळ्यात प्राण आणून, जाणून घ्यायला आतुर, पेशन्ट कसा आहे?? किती तरी जण नातेवाईक, मित्रमंडळी..अगदी सोमेे-गोमे सुद्धा..

पेशन्ट च्या प्रत्येक श्वासाबरोबर वर-खाली होणारा त्यांचा श्वास..कुणाचे बदलणारे भाव, कुणाच्या नवीन श्रद्धा/अंधश्रद्धा.. कुणाचे अजब सल्ले..हॉस्पिटल सारख्या जागी वागणारी माणसे, डॉक्टर्स..सिस्टर्स, ब्रदर्स.. काय करावं?? काय करावं?? 'अब इन्हे दवोंकी नही, दुवाओंकी जरूरत है' टाईप काहीसं सांगितल्यावर जवळच्यांनी मोठ्याने किंवा मनोमन फोडलेला टाहो..
काचेच्या आत असलेला आपला सगा, डॉक्टरी भाषेत केवळ पेशन्ट असतो..अशा शेकडो केसेस त्यांनी हाताळल्या असतात की त्यांची मनं खूप तय्यार असतात 'पेशन्टच्या हर तऱ्हेच्या रिस्पॉन्स साठी'..

 मला कल्पना आहे या सगळ्या अग्निदिव्यातून आपले नातलग, मित्रपरिवार जात असतात, कुठं तरी अंधुक आशा असते, व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे सगळं संपलं असं नाही..अजून चान्स आहे..2012 मध्ये काही लोकांनी तो चान्स घेतला आणि आज ती व्हेंटिलेटर वर ठेवलेली मुलगी 'व्हेंटिलेटर' सिनेमा पाहून भारावून हे सगळं लिहितेय.. Thanku for keeping faith and taking chance, मला हा दुसरा जन्म देण्यासाठी..
लोकहो, ये जरा पर्सनल हुआ..But माझ्याच्याने नाही राहवलं..खो खो हसले, धो धो रडले (मला आवडतं तसं)... चित्रपटात जसे विविध मानवी स्वभावदर्शन चित्रित केलंय, आणि त्यांचे बंध उलगडून दाखवलेत त्याला तोड नाही.. जीर्ण झालेल्या नात्यांना सुद्धा कधी कधी व्हेंटिलेटर वर ठेवायची पाळी येते, बंध किती घट्ट आहेत आणि त्याने घुसमट तर नाही होत ना हे वेळोवेळी चाचपावं लागतं.. मानापमान बाजूला ठेवून जीव फुंकावा लागतो नात्यात, जसा शरीराला व्हेंटिलेटर जोडावा..

राजेश मापुस्कर दिग्दर्शित, 'व्हेंटिलेटर' सिनेमा नक्की पहा..
(टीप- हे चित्रपट परीक्षण नाही)

- रमा


Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ