Skip to main content

लिपस्टिक अंडर माय बुरखा : फिस्कटलेली रंगीत स्वप्ने


आज बहुचर्चित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' पाहिला. (सौजन्य-Netflix)

एक हवाई मंजिल नामक पुरानी हवेली त्यातल्या 4 स्त्रियांची ही कहाणी. यांनी अपराध केला आहे. स्वप्नं पाहण्याचा. आपल्या मर्जीने आयुष्य जगण्याची स्वप्नं, स्वतःच्या शरीरावर

प्रेम करण्याची स्वप्नं. कर्मठ कुटुंबाच्या कचाट्यापासून ते सेक्सिस्ट, दांभिक समाजाच्या so called मूल्यांशी झगडून स्वातंत्र्य मिळवण्याची स्वप्नं.

त्यांना ती स्वप्नं पाहण्याचा अधिकार आहे तो एका उंबऱ्या आडूनच. लिपस्टिक च्या लाखो शेड्स सारखी रंगीत स्वप्नं असतील. पण ती लपवायची. त्यांना लपूनछपून रहायची परवनगी आहे. पण बुरख्याआड.

भोपाळ सारख्या ठिकाणी असलेल्या या बायका. रेहाना ही कॉलेज कन्या. तिच्याघरीच बुरखा शिवण्याचा व्यवसाय आहे. पण रॉकस्टार बनावं, बेधुंद नाचावं, गावं, जीन्स सारखा पेहनावा करावा असं तिला वाटतं. सनातनी मुस्लिम कुटुंबातील बंधनांना झुगारुन, पारतंत्र्याच्या बुरखा फाडून तिला मोकळं व्हायचंय. 

दुसरी लीला. बळजबरीने लग्न लावले जाणारी एक तरुणी, प्रियकर आणि होणारा नवरा यांच्या कात्रीत सापडलेली, बिझनेस करावा, दिल्ली गाठावी अशी तिची स्वप्ने. तिचा बोल्ड स्वभाव आणि कडवं वास्तव यात तिची फरफट होते आहे.

तिसरी शिरीन. नवऱ्याला न सांगता सेल्सवूमन चं काम करते. तिला केवळ मुलं पैदा करणारी, शारीरिक उपभोगाची हक्काची वस्तू समजणारा नवरा. तिला बळजबरी आणि बलात्कार नाही प्रेम हवे आहे, आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे.

आणि चौथ्या बुवाजी. त्यांच्याच नॅरेशनने चारी  कथा बांधलेल्या आहेत. चोरून इरॉटीक पुस्तकं वाचून स्वप्नात रंगणारी 50शी उलटलेली ही विधवा बुवाजी. 



प्रत्येकीची समांतर कथा पाहताना यातले विचार उत्तान वाटू शकतात. पण उथळ नाहीत. कारण त्यात तथ्य आहे. त्यात अतिशयोक्ती नाही. कोंकना आणि रत्ना या मुरलेल्या अभिनेत्रींनसोबत प्लबिता आणि आहना यांचा सहजसुंदर अभिनय कुठेही कमी पडत नाही. अप्रतिम बॅकग्राऊंड म्युझिक, कडक डायलॉग्ज, उपहास आणि विनोदाचा शिडकावा यात आहे. 

चित्रपटात सगळेच पुरुष सत्ता गाजवणारे आणि व्हीलनिश रंगवले आहेत. (ते असतातच सोडा). शेवटचा सिगारेट वाल्या सीन ने जरा मी कोड्यात पडले, नेमका आशय काय आहे? दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तवने हवे ते मांडले आहे, पण ते तसेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचते का हा सवाल आहे. शेवटी चौघीना हताशपणे रडत बसलेल्या न दाखवता सिगरेट च्या धुराप्रमाणे दुःख फुंकून टाकलं असं काही प्रतिकात्मक दाखवायचं आहे का हे काही मला झेपलं नाही.

 मस्ट वॉच नाही, पण वेगळा अनुभव म्हणून पाहायला हरकत नाही. मनासारख्या माणसाशी, मनात असताना, मनासारखा संग करण्याची इच्छा करणं यात चूक काय? लिपस्टिकच्या कहाण्या जो जसा बुरखा घालील त्याला तशा दिसतील. आणि कळतील तो बुरखा उतरावल्यानंतर.. 

रेटिंग- 3/5

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ