Skip to main content

ब्रिजमोहन अमर रहे: बलमा ये करमा

एक साधारण माणूस ब्रिजमोहन (अर्जून माथूर) कर्जाच्या बोझ्याने परेशान आणि जीव मुठीत घेऊन असताना हतबल होऊन स्वतःच्याच मृत्यूचा देखावा रचतो, पण स्वतःच्याच खुनाबद्दल त्याला शिक्षा ठोठावल्या जाण्यापर्यंत गोष्टी हाताबाहेर जायला लागतात. आणि तो एका संकटातून बाहेर पडतो न पडतो तो अजून वेगळ्या संकटात फसायला लागतो. अशी एकंदर 'ब्रिजमोहन अमर रहे' ची मनोरंजक  संकल्पना आहे. कलाकारही चांगले आहेत. अधूनमधून रटाळ व्हायला लागतंय असं वाटतं तोच परत पेस वाढते. 



शिव्या, अनैतिक संबंध आणि सेक्स शिवाय नेटफ्लिक्स ओरिजिनल येतच नाहीत जणू. छान ब्लॅक कॉमेडी चालू असताना अचानक कसलातरी विनाकारण अश्लील छपरीपणा सगळं फिस्कटून टाकतो. 

"मनुष्याला शेवटी आपल्या कर्माची फळं भोगावीच लागतात" हा संदेश यात दिला आहे. नेटफ्लिक्स फिल्मसची जमेची बाजू म्हणजे गोष्ट कोणत्याही कॅरेक्टरला ग्लोरिफाय केलेलं नसतं. पण या सिनेमात प्रत्येक पात्राची ब्लॅक साईड हायलाईट केलेली आहे. आणि त्याची आपल्याला सवय नाही. 

जबरदस्त पंची डायलॉग्ज, जुन्या गाण्यांचा चपखल ठिकाणी वापर याने काही ठिकाणी मजा येते. या कल्पनेवर अजून छान ड्रामा करता आला असता. पण केवळ ट्रेलर बघून पाहायला बसला तर निराश होऊ शकाल. यात ड्रामा आहे, ऍक्शन आहे, ह्यूमर आहे. हे सारं असूनही चित्रपट एक अपूर्ण ब्लॅक कॉमेडी आहे असं वाटतं. 

असो. रिकामटेकडे असाल, शिव्यांच्या भडिमारात चित्रपट पहायची सवय असेल आणि नेटफ्लिक्सवरचं सगळं पाहणारच असा पण केला असेल तर पाहा. एकदा पाहण्यासारखा आहे. बस. स्पेशल काही नाही. 

रेटिंग- 2.5/5

- रमा जाधव

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ