Skip to main content

उदरभरण नोहे..


"आई आज डब्यात काय ए?", दप्तर भरता भरता पिकलपोनीने विचारलं. "फरसबी आहे.. आणि डबा संपवला नाही ना पिकू तर मग बघ च."आई डबे भरता, भरता ओरडली. 'फरसबी' ऐकलं मात्र आणि पिकलपोनीने तोंड वेंगाडलं. "ए काय गं आई, तुला माहितीये ना मला नाय आवडत ना शेंगभाज्या, ", "अन्नाला असं घालून पाडून बोलू नये, लोकं मरतात अन्नावाचून, आपल्याला ते मिळतंय तर त्याचा मान राखा" असं म्हणत आईने दादू आणि पिकलपोनी कडे डबे सोपवले. "पिकू, तुला नेमकी कोणती भाजी आवडते गं? रोज तीच कटकट, डबा तसाच परत", दादुने मध्ये नाक घुसवलंच. पिकू चिडली. नाश्त्याला केलेले दडपे पोहे दडपायचेही त्या रागाच्या भरात राहून गेलं. दादू मज्जेत नाश्ता करत बसला. त्याला जीभ दाखवत पिकू शाळेसाठी निघाली. शाळेत पहिल्याच तासाला पिकूला भूक लागली. पण मधल्या सुट्टीला अजून होता वेळ. मधल्या सुट्टीपर्यंत कशीबशी भूक रोखून धरली. आणि एकदाची घंटा वाजताच उघडला डबा. पुन्हा डब्यात फरसबी बघून पिकूने डबा बंद केला. तिला पुन्हा राग आला. ''ही आई असं का करते? नाही आवडत मला भाजी तर मग दुसरं काही का नाही देत?", झोपीच्या डब्यात काहीतरी मस्त असेल, चला बघूया, असं म्हणत ती झोपीजवळ आली तर तिच्या डब्यात शेपू. शेपूचा वास येता क्षणी पिकलपोनीने पीछे मूड केलं आणि गेली आपल्या बेंचवर परत.
सुट्टी संपून गेली, आणि भूक मात्र अजून खवळली. शाळा सुटल्याबरोब्बर ती घरी जायला पळत निघाली. घरी पोहोचते तर बघते काय, घराला कुलूप. आई-बाबा अजून आलेले दिसत नव्हते. जेनी आंटींच्या घरातून काहीतरी बेक केल्याचा खमंग वास येत होता. दादू आला तो पुरचुंडीतून खारे दाणे खात खात. "मला दे दादू, पिकू अजीजी करत म्हणाली. "अगं, तुला शेंग भाज्या आवडत नाहीत असं सकाळीच तर ओरडत होतीस. दाणे शेंगेतच असतात. तुला नकोत ते. तिला चिडवत दादू दाणे नाचवत, खात खात म्हणाला.
एक तर भुकेने कासावीस जीव, त्यात दादू डोकं फिरवतो म्हंटल्यावर पिकूचा Travel to वैतागवाडी सुरु झाला. आई-बाबा आले, पण "मला भूक लागली" असं म्हणून हार कशी मानायची? अशा विचारात पिकू असताना बाबा म्हणाले दादू, पिकू चला फिरायला जाऊया. क्षणार्धात न खुलणारी कळी खुलली. आणि शहाण्यासारखी पिकू गाडीत जाऊन बसली. बाबांनी सहज गावातून एक फेरफटका मारून येऊ असं म्हणून नदी जवळच्या मंदिराशी गाडी आणली. बाहेर एके ठिकाणी अन्नाचा ढेर साठला होता. आजारी, वृद्ध, आणि लहान लहान मुलांची गर्दी जमली होती. थोडं-थोडकं का होईना पदरात पडावं म्हणून सगळ्यांची लगबग चालली होती. सगळ्यांच्या डोळ्यात भूक दिसत होती, पोट खपाटीला गेलेलं आणि अंग अगदी कृश झालेली अशी ती मंडळी.. "बरं का दादू, हे लोक त्यांना अन्न मिळत नाही म्हणून मिळेल तिथे मिळेल ते खातात. माणसाच्या मूलभूत गरजांपैकी 'अन्न' एक आहे ना, ती सुद्धा काही लोकांची सहजासहजी पूर्ण होत नाही" बाबा सांगत होते..पिकू त्या सगळ्यांची दयनीय अवस्था बघून स्वतःची भूक विसरली. "आज आपण एक दिवस काही नाही खाल्लं तर आपली ही अवस्था झाली आणि ही सारी मंडळी तर सतत अन्नाला पारखी. हे सारे मिळेल ते खात आहेत. गरम-गार, गोड-तिखट, शिळं-ताजं काहीही न बघता. आणि आपल्याला पोट भरून जेवण मिळतं, आई पोषण देणारं अन्न देते, आणि आपण ते नाकारून त्याचा अपमान करतो, हे काही बरोबर नाही" ते काही नाही आता आपण अन्नाचा कधीही अपमान करणार नाही, आई जे बनवेल ते खाणार पिकलपोनीने मनोमन ठरवलं.
घरी येताच ती आईला बिलगली, "आई सॉरी. मी आता कधीच डबा न खाता आणणार नाही. अन्नाचा मान ठेवेन.", पटकन दप्तरातून डबा काढून पिकूने तो डबा संपवला. भूक भागली, मनही तृप्त झालं. आई नेहमी म्हणते ना, "अन्नाला भजून खावं ", ते आज तिने आचरणात आणलं होतं. आणि आज अन्न म्हणजे केवळ "उदरभरण नोहे जाणी हे पिकलपोनी"..हे ती शिकली म्हणून आईबाबा पण आनंदी झाले.
-रमा  
(Photo Courtesy - Google)

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

शांतनू मॉइत्रा: बहती हवासा बावरा मन

प्रसिद्ध पार्श्वसंगीतकार, संगीतकार शांतनू मॉइत्राचा जन्म 22 जानेवारी 1968 मध्ये लखनौ इथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण (स्प्रिंगडेल स्कूल) येथे झाले. " इथे गाता गाता माझ्यातल्या संगीताला वाव मिळाला. आत्मविश्वास मिळाला " असे ते सांगतात. त्यांच्याच स्प्रिंगडेल स्कूलचे माजी विद्यार्थी सुश्मित बोस या अर्बन-लोकगीत गायककडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. इकॉनॉमिक्स मध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर ते एका ऍड एजन्सी मध्ये क्लायंट सर्व्हिस एक्सिक्यूटिव्ह म्हणून रुजू झाले, आणि संगीत केवळ छंद बनून राहिला होता.  एकदा अगदी लास्ट मिनिटाला जिंगल बनवायची आहे असे प्रदीप सरकार यांनी शांतनुना सांगितले. त्यांनी ते जिंगल बनवलं. ते होतं " बोले मेरे लिप्स, आय लव्ह अंकल चिप्स ". यानंतर त्यांनी अनेक कंपनींसाठी जिंगल्स बनवले. नंतर त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध अशा इंडी-पॉप अल्बम्स साठी संगीत दिले. शुभा मूदगल यांनी गायलेली " अब के सावन ऐसे बरसे " आणि '' सपना देखा है मैने "  ही त्यातली काही गाजलेली गीते. 2002 मध्ये मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर त्यांना सुधीर मिश्रांच्या ...

"न्यूड : नग्नतेतील मुक्त कलाविष्कार"

आत्ता 'न्यूड' पाहिला. एखाद्या कथेचं चित्रात रूपांतर व्हावं आणि प्रत्येक ब्रशस्ट्रोक सोबत तयार व्हावी एक एक अप्रतिम फ्रेम आणि त्यांची एक बनावी चित्रमालिका या साऱ्यांनी बनला आहे 'न्यूड'. गावातून मुंबईला आलेली यमुना 'न्यूड मॉडेल' बनते. का? कशी? त्याचे होणारे परिणाम, पात्रांची आणि शेवटी आपलीही बदलत जाणारी विचारसरणी याची गोष्ट आहे न्यूड मध्ये.  चित्रपटाची कथा नग्नतेवर बेतली असली तरी कुठेही भडक होत नाही. अश्लीलतेचा लवलेश नाही. मॉडेल म्हणून तयार होताना आधी यमुनेची होणारी तडफड, तगमग, अगतिकता आपल्याला अस्वस्थ करून सोडते.  चित्रपटात एक मोठा कलाकार (एम.एफ.हुसेन वर बेतलेला)  मलिक (नसिरुद्दीन शाह) नायिकेचं न्यूड काढता काढता तिच्याशी आणि आपल्याशीही गप्पा मारतो. "मी घोड्यांची चित्रं काढली तर कुणाला हरकत नाही, पारव्यांची चित्र काढली कुणी बोलत नाही, मग मी माणसांची चित्रं काढली तर इतका हंगामा कशासाठी?", कलाकार 'रुह' पाहत असतो. तीच चितारत असतो.  चित्रपटाची कथा नग्नतेवर भाष्य करत असली तरी कुठेही भडकपणा नाही. काही प्रसंग अंगावर येतात पण ते त्य...