Skip to main content

हलाल - बलिदान



मुस्लिम धर्मात 'हलाल' चा अर्थ आहे, वैध किंवा धर्मानुसार योग्य बलिदान. त्याप्रमाणेच हलाल चा अर्थ एखाद्या जीवाला हाल-हाल करून मारणे. हलाल ची वैवाहिक रूढी अशी की एखाद्या माणसाने जर आपल्या बायकोला त़लाक दिला आणि तिच्याशीच परत लग्न करायचे झाले तर आधी तिचे दुसरे लग्न लावायचे त्या व्यक्तीने जर आपणहून तिला (तीन महिने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेऊन बिऊन) त़लाक दिला तर ती प्रथम पतीशी लग्न करू शकते. पुरुषाने उठसूट काडीमोड घेऊ नये यासाठी त्याला शिक्षा म्हणून असला विपरीत कायदा कुराण-ए-पाक मध्ये समाविष्ट होता. धर्मातील कायदे न समजून घेता तोडून -मरोडून लोकांपर्यंत येतात आणि मग 'ख़ुदा के लिए' ते त्याचे पालन करतात त्याने धर्माचा आंधळेपणा, समाजाचा दुटप्पीपणा आणि परिणामी लोकांचे हलालरूपी शोषण होते. तिहेरी त़लाक विरोधी अशी 'हलाल' ची कथा राजन खान यांच्या कादंबरी वरून घेतलेली आहे.

 हलीम आणि खुर्दुस हे एक विवाहित जोडपे आहे, पण रागाच्या भरात खुर्दुस हलीमला तोंडी तिहेरी त़लाक देतो. 2 वर्षा साठी हलीमला माहेरी पाठवतो आणि आई वारल्यावर पुन्हा न्यायला येतो. पण वडील सरपंच आणि मौलाना पर्यंत सगळा मामला नेतात आणि 'हलाल नियम' पाळला तरच ती पहिल्या नवऱ्याकडे जाऊ शकेल म्हणून सर्वानुमते तिचे मौलानाशीच लग्न लावले जाते. शेवटी या सगळ्यात हलीमचे काय होते, काय निर्णय लागतो याची कथा म्हणजे हलाल. अनेक पुरस्कारांचा मानकरी चित्रपट हलाल यात प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, चिन्मय मांडलेकर, प्रीतम कागणे यांनी भूमिका चांगल्या वठवल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिवाजी लोटण पाटील यांचे दिग्दर्शन आहे. 

खरे तर पुरुषसत्ताक या समाजात स्त्रीचे शोषण अगदी तडपून तडपून मारल्यासारखे. तिचे दुसरे लग्न लावणारे तिचे वडील, ती आपल्याकडे परत यावी यासाठी पहिला पती, दुसरा पती यांना तिला काय वाटते हे माहीत असून लक्ष्यात घेणं जरुरीचं वाटत नाही. स्वतःचं वागणं चुकीचं आहे हे कळत असूनही 'असं आपल्या धर्मात सांगितलंय' हा त्यांचा डिफेन्स. पहिल्याने वैतागून रागाच्या भरात सोडली, दुसऱ्याच्या गळ्यात बांधली. "माझ्यावर प्रेम असेल तर धर्मासाठी करावं लागतंय म्हणत". मौलाना तर धर्म जाणणारा पण धर्मासाठी करावं लागतंय म्हणून तिला नांदवतो. दोघांनाही ती आवडत असते तरी दोघेही सोयीस्करपणे अंग काढून घेतात. हिचा खुर्दुसवर बसलेला जीव हळूहळू दुसऱ्या पतीवर बसतो. यात तिची काय चूक? इतर धर्मियांसाठी हा कुचेष्टेचा विषय होतो. एक दुसऱ्याच्या कोर्टात फेकतो, दुसरा पहिल्या कोर्टात. एखाद्या शटल सारखी अवस्था त्या बाईची. तिच्या भवितव्याचा फैसला तिसरेच करणार. हलीमची 'शेळी जाते जीवानिशी' अशी गत होते. 

सगळ्यांची पात्रे अतिशय खरी रंगविली आहेत. सगळेच हिरो आहेत. त्यांना प्रेम आहे. गिल्ट आहे. वासना आहे. दुःख आहे. धर्माचं दडपण आहे. हतबलता आहे. पण हलीमचे दुःख सगळ्यात जास्त आहे. ती नकार देत नाही, म्हणजे तिचा होकार असं समजून चालणारा हा समाज, धर्मासाठी काहीही करायला, अगदी बलिदान द्यायला ही तयार होणारा हा समाज खूपच भयंकर हे.

असा हा 'हलाल'.. चीड आणि दुःख अनुभवत पण तरीही ट्रिपल त़लाक विरोधी कायदा आल्याचे आभार मानत पाहिला. 

माझे रेटिंग- 3.5/5


Comments

Popular posts from this blog

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां...

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त...

सलील चौधरी : एक श्रद्धांजली

बंगाल प्रांत हा मुळातच मुग्ध करणारा प्रदेश आहे. कलाप्रेमींवर तर बंगालची कायमच जादू राहिली आहे. के एल सेहगल पासून अनिल बिस्वास, एस डी, आर डी, हेमंतकुमार, किशोरकुमार, मन्ना डे ते लोकगीतं गाणारे कुणी अनामिक, इथलं संगीत अत्यंत मधुर, मोहक संगीत आहे. या सर्वांतच मला 'सलील चौधरी' या संगीतकाराने नेहमीच मोहवून टाकलं आहे. आज सलील चौधरी यांचा जन्मदिवस. सुरुवात झाली 'मधुमतीने'. एकूण 12 गाण्यांचं अप्रतिम प्रदर्शन. मुकेशची तरल "दिल तडप तडप" आणि "सुहाना सफर और ये मौसम हसीं", एकीकडे लताची आर्त हाक  "आजा रे परदेसी", खेळकर "घडी घडी मोरा दिल धडके" आणि "जुल्मी संग आँख लडी" तर दुसरीकडे मोहम्मद रफीची "टुटे हुए ख्वाबोंने" ते "जंगलमे मोर नाचा" अशी बहुरंगी गाणी. "दैय्या रे, दैय्या रे चढ गयो पापी बिछुआ" गाण्याप्रमाणे  लहानपणापासूनच सलीलदांनी मला झपाटून टाकलं. आणि फिल्मी गीतांच्या जादुई दुनियेत मी प्रवेश केला. मुकेशने सलीलदांच्या निर्देशनखाली ज्याप्रमाणे गायले आहे ते खरंच उल्लेखनीय आहे. अगदी ...