Skip to main content

अंधाधून:- A Trilling Blind Game

अंधाधून:- हवीहवीशी अंदाधुंदी

आत्ता अंधाधून बघून आले.. 
नाटकाचा एक साधा नियम आहे. पहिल्या अंकात जर भिंतीवर बंदूक दाखवली, तर तिसऱ्या अंकात तिचा बार उडलाच पाहिजे. नाहीतर ती दखवण्याचं प्रयोजन काय? (*Bertolt Brecht, Chekhov and others)

एका लाईन मध्ये अंधाधूनची कथा सांगायची तर, एक तरुण प्रतिभावान 'अंध' पियानो आर्टिस्ट एक खून 'पाहतो'. आणि मग सुरू होते थरारक घटनांची मालिका. एक थ्रिलर असूनही दिग्दर्शक 'श्रीराम राघवन' यांनी बुफे सारखं, कुणाचा खून झाला, कुणी केला, कसा केला, का केला? सगळं वाढून ठेवलं आहे. काहीही प्रेक्षकांपासून लपलेलं नाही. आणि तरीही अत्यंत अनपेक्षित, वेगवान, उत्कंठावर्धक हे रहस्यपटाचे सारे गुण आपल्याला अनुभवायला मिळतात. 

गुणी कलाकार आयुषमान खुराना याने त्याची versatility इथेही जपली आहे, राधिका आपटे तिच्या नेहमीच्या बिनधास्त अवतारात आहे. छाया कदम( सैराट, न्यूड फेम), अश्विनी काळसेकर, मानव वीजे, अनिल धवन लहान लहान भूमिकांत भाव खाऊन जातात. एकदम नैसर्गिक. 

आणि तब्बू.. एक नंबर..Cold blooded, जहरी, दुटप्पी आणि चित्रपटात एक पात्र म्हणतं त्याप्रमाणेच 'बेक्कार औरत' अप्रतिम साकारली आहे. अगदी सहजतेने. 

खुनासारख्या गंभीर विषयावरील चित्रपटातही नर्म विनोदाचा शिडकावा, एक साधी आणि सुरेख डार्क कॉमेडी म्हणता येईल अशी ही फिल्म. 
सिक्स
अप्रतिम पटकथा व संवाद, अमित त्रिवेदी चे बेधुंद करणारे संगीत. 'नैना दा क्या कसूर', 'आपसे मिलकर', 'वो लडकी' ही गाणी श्रवणीय आहेत, पियानो पिसेस तर खूपच आल्हाददायक  आणि प्रखर आहेत.

चित्रपटाची सुरुवात चुकवणारे, चित्रपट सुरू असताना फोन बघत असणारे, सतत पापणी लवण्याचा प्रॉब्लेम असलेल्यांनी हा चित्रपट न पाहणे बेहतर. त्यांना यातल्या सॉलिड धक्कातंत्राचा मजा घेताच येणार नाही. 

पण बाकी लोकहो जरूर बघा, आणि मग माझ्या पोस्टच्या सुरुवातीचं  ज्ञान चित्रपटाशी किती संबंधित आहे कळेलच, असला जबराट बार उडालेला आहे. आणि शेवटी जसे या चित्रपटात सांगितले आहे,
"What is life? It all depends on the liver" अगदी तसंच "What is the suspense? It all depends on the viewer".. 

- रमा

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ