Skip to main content

मस्का- घ्या लज्जत

 आजवर लेखक, अभिनेता म्हणून परिचित प्रियदर्शन जाधव याचा 'मस्का' पाहिला. 

लोकांना भावनांच्या जाळ्यात ओढून लुटणाऱ्या भामट्यांची ही ट्विस्टस आणि टर्नस नी भरलेली अनपेक्षित कथा. 'Suspense Comedy' असा काहीसा वेगळाच genre म्हणता येईल.

सगळ्याच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. अगदी नैसर्गिक. 'बनचूका यादव' (शशांक शेंडे),  'नवशिका चिकू' (प्रणव रावराणे), 'गोंधळलेला करोडपती हर्ष' (अनिकेत विश्वासराव), रहस्याची किल्ली (चिन्मय मांडलेकर) आणि हुकुमाची राणी, Leading Lady (प्रार्थना बेहरे) यांच्या अभिनयाने प्रत्येक प्रसंग खुमासदार झालेला आहे. त्याच त्याच प्रकारच्या भूमिकांमधून बाहेर पडून नवीन काहीतरी करण्याचं स्वातंत्र्य त्यांना मस्कामध्ये मिळालं आहे. 

नाटक, TV आणि चित्रपट तिन्ही माध्यमात का म करणाऱ्या प्रियदर्शन जाधवने 'मस्का'तून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. आणि ते यशस्वीही झाले आहे. एका अर्थाने डार्क कॉमेडी म्हणता येईल अशी कथेवर काम करणं खरंच खूप challenging आहे.

चित्रपटात कोण कुणाला फसवतंय हे माहीत असूनही प्रेक्षक 'कसे' हे जाणून घेण्यासाठी खिळलेले राहतात. 'पुढे काय?' हा प्रश्न अगदी शेवटपर्यंत मनात राहतो. चित्रपटाच्या सिक्वेलचीही तयारी करून ठेवली आहे. हिंदीत धूम, ब्लफमास्टर, स्पेशल 26 अशा प्रकारचे सिनेमे येऊन गेले आहेत. मराठीत 'अशी ही बनवाबनवी' नंतर इतकी फसवणारी आणि हसावणारी फिल्म हीच असावी असं वाटतं. (दोन्हीत जाम फरक आहे, तुलना नको).

डल्ला मारणारे नेमके कसे एकत्र येतात, फसवणूक झालेल्यांचं काय होतं हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहतात. अर्थात मूळ कथानकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते अनुत्तरीत राहिले तरी फरक पडत नाही. फिल्मचा ट्रेलर अजून चांगला करता आला असता. 

मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाहीत असं म्हणणाऱ्या, इंडस्ट्रीतल्याच काही लोकांना खोटं ठरवणाऱ्या वेगवेगळ्या, प्रयोगशील फिल्म्स बनत आहेत, ही त्यातलीच एक फिल्म.

प्रवाही कथानक, धक्कातंत्राचा योग्य वापर, खो खो हसवणारा विनोद, कथेला साजेशी गाणी आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपट जमून आलाय. पण हे सगळं वाचण्यापेक्षा चित्रपट 'बघण्यात मजा आहे'. नक्की पाहा. मस्का लावा. 

रेटिंग- 3.5/5

- रमा 

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ