Skip to main content

क्युरिअस केस ऑफ बेंजमिन बटन : अंतापासून आदिकडे

एफ. स्कॉट फिट्झगेराल्ड लिखित शॉर्ट स्टोरीवर आधारित चित्रपट, ' क्युरिअस केस ऑफ बेंजमिन बटन '. अतिशय वेगळी अशी कथा आहे बेंजमिनची, आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या पात्रांची. असा बेंजामिन जो जन्माला येताच 80+ वर्षाच्या म्हाताऱ्यासारखा. जन्मदात्री आई मरून जाते तर त्याचे वडील मिस्टर बटन त्याचा त्याग करतात, एक आफ्रिकन अमेरिकन कुटुंब त्याला आपलं म्हणून सांभाळतात. वय जसं वाढतं तसं बेंजामिन मात्र अधिकाधिक तरुण होत जातो. आणि याच गोष्टीमुळे त्याचे सखे-सोयरे, प्रेयसी यांच्यासोबतच्या त्याच्या नात्यांवर कसा परिणाम होतो, जन्मानंतर पाळण्यातला बेंजामिन, मृत्यूपूर्वीही पाळण्यातले लहान बाळ होऊन जातो. याची ही विचित्र कहाणी. 


चित्रपटातील ब्रॅड पिट, केट ब्लाँचेट, ताराजी हॅन्सन यांचा अभिनय आउटस्टँडिंग आहेच पण डेव्हिड फिंशरचे दिग्दर्शनही छान आहे. कथा मांडणी सुंदरपणे केली आहे. प्रोस्थेटिक मेकअप, स्पेशल इफेक्ट्स, एडिटिंग याबाबतीत ही फिल्म अभ्यासली पाहिजे इतकी सरस आहे. 

चित्रपटाची कथा एका मरणासन्न वयस्क बाईच्या डायरीतून उलगडते आणि ती नंतर सुरू होणाऱ्या कॅटरिना हरिकेनइतकी गुंतागुंतीची आहे. 

चित्रपट सुरू होतो तेव्हा एक अंध घड्याळ निर्माता न्यू ओर्लिन्स चे रेल्वे स्टेशन ग्रँड सेंट्रल इथे लावण्यासाठी महा घड्याळ बनवतो. त्याचे उद्घाटन करण्यासाठी रुजवेल्ट येतात. पण एक मेख असते. या घड्याळाचे काटे उलटे फिरत असतात. पहिल्या महायुद्धात त्या अंध घड्याळकाराचा मुलगा मारला गेलेला असतो. तो आणि युद्धात मारले गेलेले अनेकजण परत यावेत यासाठी काळ मागे फिरवा अशी त्याची कल्पना असते. 

काळाला मागे न्या वा पुढे. जन्म आणि मृत्यू अटळ आहेत हेच खरं. चित्रपट प्रेडिक्टेबल आहे पण तरी कथा आपल्याला बांधून ठेवते. सिनेमा पाहून आपण उठतो तेव्हा काळ तर पुढे गेलेला असतो पण मागे मागे जाण्याची कल्पना रेंगाळत राहते.  ब्रॅड पिटचा नावाजण्यासारखा अभिनय आणि सह पात्रांचाही. नक्की पाहा.

- रमा

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ