Skip to main content

हर



आपण याच यंत्रयुगात इतके अवलंबून आहोत यंत्रांवर, obsessed आहोत की नजीकच्या भविष्यात जर आपण त्यांच्या प्रेमात पडलो तर नवल नाही. ही गोष्ट फक्त थिएडोर (Joaquin Phoenix) आणि एक ऑपरेटिंग सिस्टीम समँथा (आवाज- Scarlett Johansson) यांच्यातल्या नातेसंबंधाची नाही. 


एकलकोंडा, बायकोपासून विलग अशा थिएडोरला एकटेपणा घालवायला कुणीतरी हवं आहे. मग ते एखादी ऑपरेटिंग सिस्टीम का असेना तो तयार आहे. समँथा आणि थिओ यांच्यात एक नातं तयार होतं जे मैत्रीपलीकडे आहे. एकटेपणा, नैराश्य, शारीरिक गरज भागवण्याइतपत तो समँथाच्या केवळ आवाजावर  अवलंबून आहे की अजून काही जास्त भावना आहेत? ती सतत म्हणते तसं तिला भावना आणि शरीर प्राप्त होतं का? थिओडोरप्रति तिच्या वागण्याला भावना म्हणायचं का? त्या दोघांच्या नात्याला प्रेम म्हणायचं का? डिवोर्स पेपर्सवर सही घेण्यासाठी तो बायकोकडे जातो तेव्हा बायको तो यंत्रासोबत रिलेशनमध्ये आहे हे कळल्यावर त्याला नात्यांपासून दूर पळणारा, स्वप्नात रमणारा, सत्य झटकणारा, परिस्थिती नाकारणारा म्हणते. समँथा सोबततरी नाते स्थिर राहणार का? या साऱ्यांची प्रश्नोत्तरे म्हणजे लेखक, दिग्दर्शक Spike Jonze चा 'हर'


माणसाने यंत्र बनवली, पण पुढे त्याप्रति त्याची काही जबाबदारी राहणार का? ती (हर) हे केवळ एक प्रतीक आहे भविष्यात संभवणारे. 


सर्वांचेच परफॉर्मन्स बँग ऑन आहेत. स्कारलेटचा फक्त आवाज आहे फिल्ममध्ये. चित्रपटामधल्यासारखीच तिला खरी बॉडी नाही, पडद्यावर दिसत नाही तरी तिचा वावर जाणवतो. फिनिक्सबद्दल तर बोलणेच नको. त्याची पत्रे, बॉडी लँग्वेजमधून त्याचे व्यक्तिमत्व प्रकट होते. 


ही एक sci-fi नसून त्यापलीकडे खूप काही आहे. प्राईमवर आहे. पाहा जरूर. 

4/5

- रमा

#ramawrites


#Her

Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ