प्रभू रामचंद्राच्या वनवासानंतर अयोध्या नगरीने ज्या आतुरतेने त्यांची वाट पाहिली असावी तशी नेटफ्लिक्सवासीयांनी GOT, Narcos नंतर 'सेक्रेड गेम्स' च्या पुढच्या सीजन ची वाट पाहिली आणि पदरी दर दोन शिव्यानंतर अजून शिव्या असं काहीसं आलं.
झालं काय की ते, 'कुकू का जादू बादू' यात काही नव्हतं. यात सत्य होतं. आयुष्यातले सगळे दरवाजे बंद झाले की हतबल मनुष्य जितकी धडपड करता येईल तितकी करतो, मारतो, उडवतो, ओरडतो, गुरु-पंथाच्या नादी लागतो, गंडे- दोरे बांधतो. ज्यावर विश्वास नाही ते सारेही करून पाहतो. गायतोंडेचा(नवाजुद्दीन) तिसरा बाप 'गुरुजी' हाही एक प्रकारचा झिंग देणारा धार्मिक कल्ट चालवत असतो जो मुंबई खतम करण्यासाठी गायतोंडेचा वापर करत असतो.
मागील सीजन गायतोंडेचा होता, त्याने कमाल केली. दुसरा सीजन सरताजसिंग (सैफ) चा आहे. तो शोधात आहे. जे काही सापडत आहे तो चकित आहे , शोधण्यासाठीची धडपड गायतोंडेचा इतिहास आणि संपणारी मुंबई, धर्माचे राजकारण आणि राजकारणातील भ्रष्ट्राचार हे सगळं इथं दाखवायचा प्रयत्न आहे. सीजन 1 पाहिला नसेल तर यातील 1-1 मूव्हचं संदर्भासहित स्पष्टीकरण करावं लागेल.
'अमृता सुभाष' चा 'यादवबाईचा' रोल लक्षात राहण्यासारखा आहे. आमचे मित्र 'अमेय वाघ' यांनीही यात जे क्रिकेट खेळले आहे. वा! बदडून काढण्यातही ते कुशल! जितेंद्र सर नसल्याचे दुःख इतके होते जितके सरताजला काटेकर गेल्याने होते.
बाकी संवाद म्हणजे शिव्यांची बजबजपुरी. एखादाच संवाद 'दिलको छू जाता है'. त्या आश्रमात जे काही ड्रग देऊन माईंड वॉश होतो ते सीन्स, गायतोंडे आणि सरताजची, सिस्टीम सोबतची आणि स्वतःच्या मनात चालणारी छळछावणी आणि त्याला असलेले हलकेसे धार्मिक सबंध या सगळ्याचा मनावर परिणाम होईल अशी 'गोची' आहे हा सीजन. माणसाची उत्क्रांती होत आली आहे हजारो वर्ष. त्यात शुद्ध वंश कल्पना, धर्माने जगाचे तुकडे करावेत अशा कल्पना याने डोके गरगरणार नसेल, रक्त, पिस्तुलं, आत्महत्या हे पाहणं जमत असेल, उगीच कशानेही भावना दुखत नसतील तर एक वेळ पाहण्यास हरकत नाही.
Must wach नाही. पण पाहात बसाल तर नक्की "मौसम बिता जाय"..
©रमा
#Netflix
#Webseries
Comments