Skip to main content

बदल

रात्री पिक्चर बघत बसले होते, 'गुडबाय ख्रिस्तोफर रॉबिन ' आणि मी शर्यंत लागल्यासारखी धावत  फेसबुकवर लिहून टाकणार तोपर्यंत पिकलपोनीचा फोन . आवाजात सर्दी, खोकला, " हॅलो, मी पिकलपोनी बोलतेय." तोपर्यंत दादू तिच्याकडून फोन घेत म्हणाला  "अगं रमाताई तू जरा ये घरी."   
मी म्हणाले, " का रे अचानक? खरंतर मला यायचं असतं, पण राहून जातं..", दादू म्हणाला, "हे बघ, आम्ही ४ मंडळी सायकलवर मावणार नाही गं, गाडी घेऊन ये.".  मला काही कळेना. " चौघांना जायचंय कुठं खरं?". पण मग " डॉक्टरांकडे जायचंय." एवढं ऐकताच मी पटकन निघाले.

पोहोचते तर बघते काय? सगळे बाहेर. दादू, पिकू मरगळून उभे.डॉक्टर आत्त्यांकडे गेल्यावर त्यांना तपासून, काही फिल्म्सची यादी, खेळ, पत्रलेखन वगैरे औषधं लिहून त्यांना बाहेर बसायला सांगून डॉक्टर आत्यांनी मला थांबायला सांगितलं. मला बसवून बोलायला लागल्या, " रमा, तू लिहून यांचं जग, पिकलवर्ल्ड  बाहेर, आपल्या जगात आणलंस. पण त्यांना कायमचं इथे वास्तवात आणायची ही कसली धडपड? राहू दे की त्यांना पिकलवर्ल्डमध्ये. पिकू आहे बोलायला आज्जीबाईसारखी पण अगदी निरागस तिचा निरागसपणा हरवत चाललाय. दादूचा खेळकरपणा हरवत चाललाय.  त्यांना जरा अजून कल्पनांच्या जगात राहू  देत की, पेंटिंग येतं की नाही हे हातात रंग हातात घेतल्याशिवाय कसं कळणार. माखू दे मातीत, पडू दे  खेळू देत शब्दांशी. उड्या मारू दे, नाचू देत. आणि त्यांच्या आई बाबाना म्हणावं, तुम्ही दोघेही जरा दंगा करा. मोठं नाही होत माणूस पिकलवर्ल्डमध्ये मग त्याचा फायदा घ्या ना!! त्या पिकलपोनीला निष्पाप पिल्लूच राहू दे. Don’t spoil it. वास्तवाची खूप मोठी किंमत चुकती करून त्यांच्या कुटुंबाने जागा मिळवली आहे ना , मग तूही  नको नको ना करू तसं. फक्त गोष्टी लिही. त्यांना साजेशा.  They will be fine.

मी म्हणाले , “हो डॉक्टर, आता तुम्हाला लिखाणात दिसेल बदल नक्की.तुम्हाला वाटला तर नक्की सांगा तुम्हीही..

-रमा


Comments

Popular posts from this blog

दशक्रिया

मेलेल्या व्यक्तीचे दहन झाल्यानंतर, पुढील काही दिवस 'दशक्रिया विधी' केले जातात. असे समजतात की याने आत्म्याला शांती मिळते, जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होते आणि मोक्ष प्राप्त होतो. तिसऱ्या दिवशी राख नदीत सोडण्यापासून ते तेराव्यापर्यंत या विधी चालतात. पवित्र गंगेच्या तीरावर या विधी करतात. महाराष्ट्रातल्या पैठणला दक्षिण काशी मानतात त्यामुळे इथली गोदावरीही गंगेसारखीच पवित्र (आणि प्रदूषित) आहे. हिच्या घाटावरही हे क्रियाकर्म चालते. ब्राह्मणातील किरवंत या पोटजातीचे लोक हे विधी करतात. आणि तेच त्यांचे उपजीविकेचे साधन असते. यांना ब्राह्मणातील इतर पोटजातीहून कमी लेखले जाते. त्यांना शुभ सभारंभाला न बोलावणे, मंदिरात गंध-पूजेचा मान न देणे अशा प्रकारे अवहेलना करून केवळ मर्तिकालाच त्यांचे स्मरण होते. पण यांच्यातील काही लोकही 'दशक्रिया विधींचं' व्यावसायिकरण करून, मृत व्यक्तीच्या आधीच दुःखी-कष्टी नातेवाईकांना अमूक अमूक विधी न केल्यास आत्म्यास शांती मिळणार नाही अशी भीती घालून समाजातील इतर लोकांचे शोषण करतात. काहीजण निर्ढावून अक्षरशः आपले दुकान मांडून लोकांना गिऱ्हाईक बनवून, इतकेच नव्हे त

गीताई आणि आई

"आई आम्हाला ना गीताई शिकवत आहेत त्या नवीन मॅडम. तू मला आणि दादूला म्हणायला लावायचीस बघ. ते आत्ता शाळेत म्हणायला आहे." "अरे वा! अगं पिकू, अजूनही सांगतेच की मी, की करा पाठ, म्हणा, शिकवलेली स्तोत्रं, रामरक्षा, मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष. पण वेळच नसतो तुम्हाला. आमच्या लहानपणी..असो.. "ए दादू, ये इकडे. बघ बघ. ते बघ आई परत स्वतःशी पुटपुटायला लागली" "काय विषय काय आहे?" - दादू "दादू, पिकू या असे समोर बरं" "आई मला अभ्यास आहे आणि दादूला टेनिस ला जायचंय म्हणतोय. हो ना रे?" "2 मिनिट थांब दादू. या दोघे समोर. खूप दिवस माझ्या मनात होतं हे, आणि त्यामागे काही कारणेही आहेत.  तुम्ही शांतपणे अर्धा तास तरी यासाठी देऊच शकता ना, टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करून? मग नंतर जा खेळायला आणि अभ्यासाला. कारण तेही महत्वाचं आहेच." " अगं आम्हाला 0 काही कळत नाही आणि कशाला उगाच म्हणायचं? आम्हाला कंटाळा येतो." "तुम्हाला माहीत आहे, हे सारं आम्ही का म्हणायला सांगतो? यामागे काही धार्मिक कारणं नाहीयेत. तुमचं पाठां

चारचौघी

परवा चारचौघी बघून आले. शो हाऊसफुल्ल होता. टिकीट्स मिळत नव्हती, पण राजसीमुळे मिळाली आणि I am greatfull की तिच्यामुळे इतकी सुंदर कलाकृती बघायला मिळाली. चारचौघी बघून आले आणि डोक्यात चक्रीवादळाने थैमान घातलं. ३१ वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आलं आणि तरीही ते तितकंच रीलेटिव्ह वाटतं, आणि एकंदर आपली समाजव्यवस्था पाहता ते अजून अनेक दशकं ते तितकंच रीलेटीव्ह वाटत राहील. प्रशांत दळवीने, एका पुरुषानी बाईपणाचे कंगोरे इतक्या बारकाईने मांडणं, आणि त्यांच्या मनातील तुफानाचा ठाव घेणं is really commendable. संहितेला योग्य न्याय दिला आहे त्यांनी. काळाच्या कितीतरी पुढचं आहे हे लिखाण असं म्हणावं तर यातील शब्दन शब्द असंख्य बायकांच्या मनाला स्पर्शून गेलेल्या असतो. काळ कुठलाही असो मग. चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, त्यांनी संहितेला खराखुरा न्याय मिळवून दिला आहे. कास्टिंग अफलातून झालं आहे. यातले सारेच कलाकार खूप ताकदीचे आहेत. या चारचौघींचे भिन्न भिन्न प्रश्न आहेत. सगळ्या सक्षम, सुशिक्षित, सुजाण आहेत. आपल्या पायावर स्वाभिमानाने उभ्या आहेत. या सगळ्याच स्त्रिया त्यांच्या त्यांच्या आ